Wednesday, April 25, 2012

शूर शिलेदार येसाजी कंक.......

शूर शिलेदार येसाजी कंक.......
जेव्हा छत्रपती शिवराय हे राज्याभिषेकानंत र दक्षिण दिग्विजयासाठीगेले होते त्यावेळी आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनीकुतुबशहाशी हातमिळवणीकेली होती. कुतुबशहाने भेटीच्या वेळी विचारले की"मराठा सैन्यामधे हत्ती कां नसतात..?"त्याबद ल्यात शिवरायांनी उत्तर दिले होते की"स्वराज्याच्य ा सैन्यातील प्रत्येक मावळा हा हत्तीवर भारी पडू शकतो."तेव्हा येसाजी कंक यांनी आपल्या राजाचा शब्द खरा करून दाखवण्यासाठी म्हणून आखाड्यात उडी घेतली. त्यांनी हत्तीशी एकट्याने झुंज दिली व हत्तीस पळवून लावले.
शिवाजीराजेंनंतर शंभूराजेंसोबत त्यांनी फोंड्याला पोतुर्गीजाना पाणी पाजले या युध्दाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.गोवा जिंकल्यावर शंभूराजेंनी पोर्तुगीजशी तह केला होता.पण औरंगजेबने,कुडाळ च्या सावंतने तसेच वेंगुर्ल्याच्या देसाईने,पोर्तुग ीजांना फितवून फोंडा किल्यावर आक्रमण करावयास लावले.त्यावेळी फोंडा किल्याचा किल्लेदार येसाजी कंक हा होता.पोर्तुगीजा ंनी जोरदार आक्रमण करून फोंडा किल्यास भगदाड पाडले.यावेळी किल्यात फक्त आठशे मावळे होते.
पोर्तुगीजांनी किल्याच्या भगदाडातूनआत प्रवेश केल्यानंतर येसाजी त्याचा पुत्र कृ्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली.पण पोर्तुगीजांची संख्यामोठी असल्यामुळे मराठ्यांचा टिकाव लागेना.याचवेळी शंभूराजें येसाजीच्यामदतीस एक हजार घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन आले.त्यामुळे मराठ्यांना अधिक चेव चढला.मराठ्यांपु ढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला.या युध्दात येसाजी कायमचे जायबंदी झाले तर त्यांचा पुत्र कृष्णाजी युध्दात मारला गेला.या युध्दात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजेंनी येसाजीस एक हजार होन नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला.

No comments:

Post a Comment