Wednesday, April 25, 2012

पाटलांची मोगलाई उतरवली.....


पाटलांची मोगलाई उतरवली

२८ जाने। १६४६ चे
शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र
सापडले

राजे १५ वर्षांचे झाले होते. फर्जंद महाराज
साहेबांनी दिलेल्या विश्वासू, कर्तबगार,
हरहुन्नरी लोकांच्या सानिध्यात
आणि आईसाहेब जिजाऊ यांच्या कडक
शिस्तीच्या आणि तितक्याच
मायेच्या सानिध्यात शिवाबराजे
पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे वाढत होते. हळू हळू
मुलुख बदलत होता, पण
माणसांची मानसिकता अजून बदलत
नव्हती मुलखातील मोघलाई संपता संपत
नव्हती. काही लोक अजून जुन्याच वळणाचे होते.
गावचे पुढारी पाटील म्हणजेच रयतेचे मायबाप
असे नसून मालकी हक्कच गाजवत होते.

शिवशाहीच्या सूर्याने आसमंतात
उगविण्यापूर्वीची जणू लाली धरली होती
परंतु.पाटलांच्या,वतनदारांच्या मनात खोलवर
चिखलात रुतून पडलेल्या जनावराप्रमाणे घर
करून बसलेली मोगलाई मात्र उतरायचे नावच
घेत नव्हती. उगवत्या सूर्याकडे आशेने पहाताना
रयत राजरोज हुंदक्या मागून हुंदके देत होती.
कुंपणानेच शेत खाल्लं तर न्याय मागायचा
कुणाला आणि आपलं दुःख सांगायचे कुणाला.
आणि एके दिवशी असाच एक प्रकार
मासाहेबांच्या कानी आला
पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे

या गावचा पाटील बाबाजी बिन
भिकाजी गुजर याने बदअमल केला.
रांझे,रांझे गावचा पाटील, सगळ्यांना प्रकरण
फारच गंभीर वाटू लागले
काही तरी मोठा प्रसंग घडणार हे मात्र
नक्की होते पण नक्की काय होणार
त्याच्या सोबत हेच फक्त जाणून घ्यायचे होते
ह्याच्या आधी देखील पाटलाने असेच शेण खाल्ले
होते परंतु निवडा करणारेच कोणी नव्हते. पण
जनेतेचे गाऱ्हाणे ऐकणारी आई
आता लालमहाली बसली होती. जणू
पोटाच्या पोराच्या मायेनेच ती त्यांचे
सांत्वन करी न्यान निवडा करी.
आणि त्यात रांझे हे गाव
आऊसाहेबांच्या मालकीचे त्यांच्या वैयक्तिक
खर्चासाठी ह्या गावची मालकी आऊसाहेबांकडे
आणि त्यांच्याच गावात हा गुन्हा म्हणजे घोर
पाप कारण रयतेवर प्रेम करणारी आई रयत
नासवना-यांच्या विरुद्ध जणू चंडीचे रूपच धारण
करी , हा निवडा मात्र राजांनी केला कारण
राजे जाणते देखील झाले होतेच।
राजांना हि वार्ता कळली त्यांनी बाबाजीस्
ताबडतोब सदरेस बोलावून घेतले. त्याची
चौकशी केली, चौकशीत गुन्हा सिद्ध झाला.
त्याचवेळी महाराजांनी त्वरित त्याची
पाटीलकी जप्त केली.

इतकेच नव्हे तर त्याचे
हात पाय कलम करून त्याला कामावरून दूर केले.
हिंदवी स्वराज्य हे मोगलाई पेक्षा कसे वेगळे
आहे ते स्वराज्यातील जनतेच्या लक्षात आले. !

गुन्हेगारास शिक्षा ठोठावणारे महाराज
कठोर वाटले तरी मनाने मृदू होते. बाबाजी
निपुत्रिक होता. त्यामळे अपंगावस्थेत त्याचा
संभाळ कारांयःची तयारी गुजर कुळीच्याच
सोनजी बिन बनाजी गुजराने दर्शविली तेव्हा
महाराजांनी मेहेरबान होऊन मौजे रांझेची
पाटीलकी सोनाजिच्या नावे करून दिली व
बाबाजीसही पालनपोषणार्थ त्याच्या
स्वाधीन केले ( शककर्ते शिवराय )
ह्याच संदर्भाचे २८ जाने। १६४६ चे
शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र
सापडले आहे

आभार अभिषेक कुभांर
संदर्भ - असे घड्ले शिवाजी  महाराज  फेसबुक

No comments:

Post a Comment