मित्रांनो.. २२ मार्च ,
धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले धर्मवीर शंभूराजे यांची पुण्यतिथीदिनी महाराष्ट्राचा मानाचामुजरा !
१५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या
किल्ल्यातझाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून
अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्त केला. त्या वेळी संभाजीराजांना
औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्त
संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण
होता. महाराजांनी वैयक्तिकसुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान
महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान
परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी
त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना `मुसलमानझाल्यास जीवदान
मिळेल',असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान
सरदारांचा सतत अपमान केला.
शेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले,
जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल
सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्द ल
त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता.
हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन
अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून
मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९
दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी
बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी
तुडवणारा इतिहासाच्यादरबारातील गुन्हेगार ठरला.
संभाजीराजांच्या या
बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर
मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणिघराघरांचे
किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड
घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी
महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमानपुन्हा जागा झाला, ही तीनशे
वर्षांपूर्वीच्य ा राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे
इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत
गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली.
धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले धर्मवीर शंभूराजे यांची पुण्यतिथीदिनी महाराष्ट्राचा मानाचामुजरा !
१५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यातझाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण होता. महाराजांनी वैयक्तिकसुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना `मुसलमानझाल्यास जीवदान मिळेल',असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.
शेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्द ल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्यादरबारातील गुन्हेगार ठरला.
संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणिघराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमानपुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्य ा राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली.
No comments:
Post a Comment