Wednesday, April 25, 2012

छत्रपती संभाजी

एक ग्रंथ जो गागाभट्ट नी लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव आहे 'समनयन'.
त्या ग्रंथाच्या पहिल्या पानावरती जे समर्पन आहे त्यात असं लिहिलं आहे,
'ज्याच्या पराक्रमाने दाही दिशा तळपतात अश्या शंभू राजांच्या त्या पवित्र विचारांना समर्पित.'
संभाजी महाराजांची विद्वत्ता काय आहे हे गागाभट्ट त्यांच्या प्रस्तावन्या मध्ये लिहितात.
संभाजी महाराजांनी स्वत: ४ ग्रंथ लिहिले हे तर आपल्याला माहिती आहे.
वया च्या १४ व्या वर्षीपहिला ग्रंथ लिहायला सुरवात केली आणी २० व्या वर्षी पुर्ण केला लो म्हणजे 'बुद्धभुषण'.
भल्या भल्या पंडितांना तोंडात बोट घालायला लागतील असा तो बुद्धभुषण ग्रंथ आहे. त्यातलं एक वाक्य असं आहे की बांबुच्या झाडाला शंभर वर्षा नंतर फुलं येतात आणी फुलं आल्या नंतर ते झाडमरत असतं.
याचा अर्थ असा की संभाजी महाराज फक्त साहित्यिक नव्हते तर इतर व्याव्हारिक न्यान हवं ते सुद्धा भरपूर होतं.
संभाजी महाराजांनी आणखी ३ ग्रंथ लिहिले वयाच्या ३० व्या वर्षा पर्यंत.
'नखशिख'
'सातसतक'
आणि 'नाइकाभेद'.
नाइकाभेद मध्ये न्रूत्याचे प्रकार किती असतात हे लिहिलं आहे. आज जे आपण भरतनाट्यम पाहतो ते भरतनाट्यम नाइकाभेद वरती आधारित आहे.
भरतनाट्यम या न्रूत्य प्रकाराचे जनक संभाजी महाराज आहे याचा पुरावा नाइकाभेद मध्ये सापडतो. नाइकाभेद हे संभाजी महाराजांनी लिहिलेल दुसरं ग्रंथ.
तिसरं ग्रंथ आहे नखशिख.
नखा पासनं तर शिखा पर्यंत म्हणजे पायाच्या नखा पासन तर शिखा पर्यंत म्हणजे डोक्या पर्यंत शरिराचं आरोग्य शास्त्र काय आहे. का तुम्ही आजाकी पडता आणी कसं तुम्ही नीट होऊ शकता याचा सखोल अभ्यास या ग्रंथात आहे.
याचा अर्थ हा की संभाजीमहाराज हे Doctor सुद्धा होते. हा ग्रंथ शैल्य चिकित्सेवरती आधारित आहे.
आणखी काय उधारण द्यायचं संभाजी महाराजांच्या विद्वत्तेचं?
संभाजी महाराजांचा शेवटचा ग्रंथ आहे सातसतक.
राजानी राज्य करतांना प्रजेला आपलं कुटुंब समजुन राज्य करायचं. मीत्या राज्याचा मालक नाही तर सेवक आहे ही भुमीता घेऊन राज्य केलं पाहिजे.
छत्रपती संभाजी हे चक्रवती संन्यासी आहे याचा पुरावा या ग्रंथात भेटतो.
त्यांनी आपल्या आयुष्यात तो प्रयोग करुन पाहिला.

No comments:

Post a Comment