Saturday, June 23, 2012

जोडले जे नाते

जोडले जे नाते
नात्यालाच भाव होतो
नाही जोडणार आता
कारण नंतर फार त्रास होतो

मनाने विचार करतांना
डोक्याचा फार राग होतो
नाही करायचा मनाने विचार
कारण नंतर फार त्रास होतो

कोणातरीसाठी विचार करण्यात दिवस असेच खपले
चुकिच्यावर प्रेम केलं
हे समजून स्वतःचा राग येतो
नाही जोडणार मनं आता
कारण नंतर फार त्रास होतो

तोच तोच चेहरा बघून
घडलेल्या गोष्टींची आठवण
आणि बिघडलेल्या नात्याचा भास होतो
नकोच आता तो विचार
कारण नंतर फार त्रास होतो

स्वतःला आता वेळ देण्यात
जीवनातं फक्त मी आणि कवितेचा विचार होतो
विचार विचार करून चांगल्या गोष्टींचा र्हास होतो
कारण नंतर फार त्रास होतो...

No comments:

Post a Comment