ते दिवस असे होते की,
कुणीतरी माझ्यासाठी झुरायची..
आणि मी फोन केला नाही की मात्र,
स्वःताचं फोन करून गप्पा मारायची..
ते दिवस असे होते की,
कोणीतरी माझ्यासाठी जुरायची..
आणि मी नाही बोलले की,
ती रड रड रडायची..
ते दिवस असे होते की,
माझा आवाज ऐकण्यासाठी कोणीतरी दहावेळा फोन करायची..
मी बिझी असेल म्हणून,
फोन करणं टाळायची..
ते दिवस असे होते की,
कोणीतरी मला भेटण्यासाठी,
नेहमी आतुर असायची..
मी येणार नाही म्हटले की,
डोळ्यात पाणी आनायची..
आज दिवस असा आहे की,
कुणीतरी विनाकारण मला टाळतेय,
काम नसेल तरी बिझी आहे रे म्हणून सांगतेय,
वेळ देऊनही फोन नाही करत..
आज प्रश्न असा आहे की,
का तिने स्वार्थासाठी नातं जोडलं..
का मैत्रीचं नाव घेऊन नातं तोडलं,
का माझं जीवन खराब केलं..
दु:खातही मी मात्र हसतोय,
आणि आता मात्र नुसते,
कुणासाठी तरी बेकार जिवन
जगतोय..
कुणासाठी तरी बेकार जिवन जगतोय..
No comments:
Post a Comment